ऋजुता दिवेकरने सांगितल्या उन्हाळ्यावर मात करणाऱ्या 3 टिप्स

Healthy Way To Beat The Heat- उन्हाळ्यात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक असते. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 गोष्टी. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 10, 2024, 07:10 AM IST
ऋजुता दिवेकरने सांगितल्या उन्हाळ्यावर मात करणाऱ्या 3 टिप्स  title=

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या झपाट्याने वाढू लागल्या आहेत. उन्हाळ्यात लोकांना अनेकदा ॲसिडिटी, अपचन किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. ज्याचे कारण पोटातील वाढती उष्णता असते. वाढत्या उष्णतेमुळे दिवसा घराबाहेर पडल्याने उष्माघाताची समस्याही वाढते. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, वाढत्या तापमानात स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून आराम मिळवण्याचे काही आरोग्यदायी पर्याय सांगितले आहेत. 

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी काय करावे? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar)

हंगामी फळे खा

टरबूज, खरबूज किंवा काकडी यासारखी हंगामी फळे सकाळी 11 च्या सुमारास खा. हे फळ घामामुळे शरीरातून निघून गेलेले द्रव भरून काढण्यास मदत करते. या फळांमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि उष्णतेपासून दूर राहण्यासाठी आपण पुरेसे पाणी सेवन करणे आणि आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. ऋजुता दिवेकर कायमच त्या त्या हंगामातील प्रादेशिक फळांना प्राधान्य दिलं आहे. 

दुपारी दही भात खा 

दही-भात, एक पारंपारिक भारतीय डिश, गरम दिवसांमध्ये आपल्या पोटासाठी एक थंड आणि हलके जेवण आहे. दही त्याच्या थंड गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि जेव्हा भातामध्ये मिसळले जाते तेव्हा ते एक संतुलित जेवण बनते, जे पचण्यास खूप सोपे आहे. दुपारच्या जेवणात लोणचं किंवा पापड सोबत खाऊ शकता. लोणचे किंवा पापड खाल्ल्याने तुमच्या जेवणाची चव तर वाढतेच पण त्याचबरोबर जेवणात चटपटीतपणा किंवा कुरकुरीतपणा येतो.

गुलकंद पाण्याचे फायदे

पाण्यात मिसळलेले गुलकंद हे आरोग्यदायी आणि चवदार पेय आहे, जे शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. गुलकंद त्याच्या थंड गुणधर्मांसाठी ओळखला जातो आणि बर्याचदा उष्णतेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी वापरला जातो. रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद पाण्याचे सेवन केल्याने केवळ ताजेतवाने होत नाही तर पचनक्रियेतही मदत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

उन्हाळ्यात हे पदार्थ खाण्याचे फायदे 

  • ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळेल
  • पोट फुगण्याची समस्या दूर होते
  • सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो
  • थकवा दूर करण्यासाठी फायदेशीर
  • अपचनाची समस्या दूर होते.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)